---|| राजे ||---

Friday, October 1, 2010

---|| सेनापति सरनोबत हाम्बीररावांस पत्र ||---

"क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शंभू छत्रपती प्रती

सरनोबत, सरलष्कर हंबीरराव मोहिते दंडवत उपरी,

मामासाहेब नात्याने आम्हीही आपले भाचे आहोत. भोसले आणि मोहिते घराण्याची सोयरिक् तर गेल्या तीन पिड्यांची .

आबासाहेबानी तुमच्या मस्तकावर सेनापतिपदाचा मन्दिल काय म्हणून ठेवला? सोयराबाई साहेबांचे बंधू म्हणून नव्हे ,

तर महाराजाना महाप्रतापी प्रतापराव गुजरांची जागा भरून काढायला एका रतनाची आवश्यकता होती .

आता थोरले महाराज गेले, आम्ही सारे पोरेके जाहालो ! योग्य तो निर्णय घेण्याइतके आपण सुद्न्य आहात मामासाहेब ---

उपरी आधिक काय लिहाव ? अंतर ना पडू द्यावे ही प्रार्थना "

============================================================================
 
"क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शंभू छत्रपती प्रती राजश्री हंबीरराव मोहिते सरनोबत, सरलष्कर
तिर्थरुप आबासाहेबांचे महानिर्वाण जाहाले, आमच्या मस्तकावर अस्मानच फुटले. एशा कालकोपमधे एकच गोष्टा चांगली म्हणायची.
तीन मासामागे पन्हळगडि तिर्थरुप आबासाहेबानची दिर्घ भेट घडोनि आली. त्यांचे सहवासे सलग चार पाच रोज बहूत मसलति जाहल्या. मनातल्या आंदेशांचा आणि किन्तुपरंतु चा निचरा झाला. आम्हाकडून मोगलाईकडे निघून जाण्याचा आविवेकही आबासाहेबांनी पोटात घातला तिर्थरूपांचे काळीजच डोंगराएवढे. माफिही केली आणि मोगलांविरुध नव्या आघाडीची कामगिरीही त्यांनीसांगितली. तिर्थरूपांचे अवचित जाण्याची जखम खूप दांडगी . आठवाणे अजूनही डोळे गळतात. याउपरिही श्री कृपेकरून पुन्हा कंबर कसून खडे राहण्याचा आमचा मन्सुबा पक्का आहे. परंतु काही द्रष्ट कारभा-यांच्या आणि स्वार्थी मानत्यांच्या चाली तिरक्या आहेत. दिलामधे खोट. बालके राजारामांना गादीवर बसवण्याचा घातकि विचार ते मातोश्री सोयराबाईंच्या डोक्यात भरवतात. स्वार्थापोटी राजघराण्यात बखेडा करू बघतात. मामासाहेब राजारामाप्रमाणे आम्ही आपले सख्खे भाचे नसु, पण हिंदवी स्वराज्य निर्माण कर्त्या शिवाजीचे बाळ आहोत. त्या पापी औरंगजेबाचा एक दिवस काळ ठरू. आज राज्यापुढच्या वाटा निसरड्या. पल्ला दांडगा गाठायचा मन्सुबा आहेच. एशा वख्तास आपलाही हात द्याल तर संकटाचा दर्या सहज पार करू. हातून गलति घडल्यास आवश्य कान पिळायला आपुला अधिकार.
औरंगजेब पातशहा खूप माजला आहे. जिझीया कराचे हत्यार आपूल्या मस्तकी मारू चाहतो. राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित होते, ते चालवावे हेच आम्ही अगत्य जाणोन कारभार करितो, आशीर्वाद असु द्यावे, जाणिजे, लेखनाळंकार. .
संदर्भ :-
http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:154199

No comments:

Post a Comment